सांडेलावगण - कासारी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोहर बेनेरे यांची निवड
रत्नागिरी : तालुक्यातील सांडेलावगण - कासारी ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी मनोहर नथुराम बेनेरे यांची दि. २३/८/२०२४ रोजीची तहकूब झालेली ग्रामसभा दि. ३०/८/२०२४ रोजी संपन्न झालेल्या ग्रामसभेमध्ये निवड करण्यात आली.
गाव स्तरावर छोटे छोटे तंटे, वाद, तक्रारी मिटवण्यासाठी व योग्य न्याय देण्यासाठी अशा समितीची स्थापना करण्यात येते. जेणेकरून अशा गोष्टी गावाच्या बाहेर न जाता गावातील तंटा गावातच सोडवावा, या हेतूने निवड झालेले बेनेरे हे सद्यस्थितीत सांडेलावगण ग्रामविकास विश्वस्त संस्था, मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या स्थानिक समितीचे सचिव आहेत. त्यामुळे गावाशी त्यांची नाळ तरुण वयापासून जोडली गेलेली आहे. आणि गावातल्या सामाजिक, राजकीय विषयाशी त्यांची चांगली पकड दिसून येते. त्यामुळे गावातील वाद गावातच संपविण्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल सांडेलावगण - कासारीचे सरपंच दर्शना बेनेरे, उपसरपंच संदेश महाकाळ, सांडेलावगण ग्रामविकास विश्वस्त संस्था, मुंबई यांच्याशी संलग्न असलेल्या स्थानिक समितीचे मंडळाचे अध्यक्ष संजय मांजरेकर, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, ग्रामस्थ यांनी व उपस्थितांनी बेनेरे यांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 05-09-2024
What's Your Reaction?