रत्नागिरीला पावसाचा 'यलो अलर्ट'

Sep 11, 2024 - 10:45
 0
रत्नागिरीला पावसाचा 'यलो अलर्ट'

रत्नागिरी : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जोरदार झालेल्या पावसाचा जोर दुसऱ्या आठवड्यात पुरता ओसरला आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने उघडीपच घेतली. कोरडे वातावरण झाल्याने तापमानातही वाढ झाली. मात्र, येत्या दोन दिवसांत पुन्हा पाऊस सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील रायगड, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी भागात पावसाला अनुकूलता निर्माण होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या प्रभावाने किनारी भागात बुधवारी आणि गुरूवार जोरदार पावसाची शक्यता आहे. दोन दिवसात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता असून यामध्ये किनारी भागातील रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर राहणार आहे. त्यामुळे हे जिल्हे पावसाच्या 'यलो झोन'मध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 11-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow