राजापूर : सार्वजनिक स्वच्छतागृह इमारतीच्या अर्धवट कामामुळे जनतेची गैरसोय

Jun 6, 2024 - 10:25
 0
राजापूर : सार्वजनिक स्वच्छतागृह  इमारतीच्या  अर्धवट कामामुळे जनतेची गैरसोय

राजापूर : राजापूर नगरपालिका इमारतीलगत असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम अद्यापही अर्धवट आहे. त्यामुळे बाजारपेठेत येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय होत आहे. 

या स्वच्छतागृहाची इमारत कोसळून त्या जागी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम सुरू झाल्यानंतर जनतेच्या सोयीसाठी कोदवली नदीपात्रात तात्पुरच्या  स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, त्याचा फारसा वापर होताना दिसत नाही.

राजापूर नगरपालिकेच्या इमारतीला लागून असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या इमारतीचे काम अद्यापही अर्धवट आहे. मात्र, गेली चार महिने होत आले तरी इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शहरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांसह व्यापारी व शहरवासीयांची मोठी गैरसोय होत आहे. पाऊस कोकणच्या वेशीवर आला आहे. त्यामुळे कोदवली नदीपात्र पाण्याने दुथडी भरणार आहे. अशावेळी कोदवली नदीपात्रातील तात्पुरचे स्वच्छतागृह हटविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. पाऊस कोकणच्या वेशीवर आला आहे. त्यामुळे कोदवली नदीपात्र पाण्याने दुथडी भरणार आहे. अशावेळी कोदवली नदीपात्रातील तात्पुरचे स्वच्छतागृह हटविण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर जनतेची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नव्या स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. सद्यःस्थितोत स्वच्छतागृहाच्या कामाची गती पाहता पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वच्छतागृह जनतेसाठी खुले होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे याचा त्रास बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या जनतेची मोठी गैरसोय वाढणार आहे.

पालिका प्रशासनाने या कामाकडे गांभीर्याने लक्ष घालून लवकर स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करून जनतेची गैरसोय दूर करावी - अजीम जैतापकर, शहराध्यक्ष, राजापूर काँग्रेस 

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:52 AM 06/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow