कोथिंबीर महागली..!
रत्नागिरी : गेल्या १५ दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. यामुळे भाज्यांच्या दरात २० ते ३० रुपयांची वाढ झाली आहे.
सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणात वापरण्यात येणारी कोथिंबीर सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेली आहे. कोथिंबीरच्या एका जुडीला ५० ते ६० रुपये दर मिळत आहे. अवकाळी पावसाने पिकांना चांगले झोडपून काढल्याने कोथिंबीर जागेवरच खराब झाली. परिणामी कोथिंबीर सर्वात महाग झाली आहे. मेथीचे दरदेखील ५०-६० रुपयांपर्यंत गेले आहे. याबरोबरच अन्य पालेभाजांचे दरही चांगलेच वाढले आहेत. किमान महिनाभर तरी दर चढेच राहणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:51 11-06-2024
What's Your Reaction?