कंत्राटी भरती विरोधात शिक्षक संघटनांचा एल्गार; २५ सप्टेंबरला प्राथमिक शाळा बंद ठेवणार
पुणे : कंत्राटी शिक्षक भरतीच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी येत्या २५ सप्टेंबरला प्राथमिक शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
शिक्षक संच मान्यता व कंत्राटी शिक्षक भरतीचा शालेय शिक्षण विभागाचे निर्णय डोंगरी, दुर्गम भागातील तसेच वाडीवस्तीवरील शाळांतील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही निर्णय रद्द करावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या अन्यायकारक निर्णयामुळे राज्यातील १५ हजार शाळांमधील प्रत्येकी एक शिक्षक कमी होऊन १५ हजार शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शासनाने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, असे मत सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यक्त केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:35 16-09-2024
What's Your Reaction?