चिपळूण : गडनदीवरील नव्या पुलावरून आरवलीत वाहतूक सुरू

Jun 7, 2024 - 11:22
 0
चिपळूण : गडनदीवरील नव्या पुलावरून आरवलीत वाहतूक सुरू

चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावर आरवली येथील गडनदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे. पावसाळ्यापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला केल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त केला जात आहे.
मागील अनेक दिवसांपासून या पुलाचे काम सुरू होते. या दरम्यान जुन्या पुलावरून वाहतूक सुरू होती. मात्र, पुलाचे काम सुरू असताना वाहनचालकांना फार त्रास सहन करावा लागत होता. पुलाच्या रस्त्यासाठी दोन्ही बाजूने खोदाई करण्यात आली होती. खोदलेल्या भागातील माती वाऱ्याबरोबर उडून जात असल्यामुळे धुळीचा वाहनचालकांना त्रास होत होता. उन्हाळ्यात या समस्येला वाहनचालकांना सामोरे जावे लागले. 

गडनदीवर पुलासाठी नदीत सहा पिलर उभारण्यात आले होते. पिलर उभारल्यानंतर पुलाचे काम दोन वर्षे सुरू झाले नाही, त्यामुळे नदीत उभारलेले पिलर केवळ शोभेचे बाहुले म्हणून उभे होते. सहा महिन्यांपूर्वी पिलरवर बांधकाम करून नंतर कॉक्रिट टाकण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचा जोडरस्ता तयार करण्यात आला. पावसाळ्यापूर्वी या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चिपळूणहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने या पुलावरून जातात. रत्नागिरीहून चिपळूणकडे जाणारी वाहने मात्र अजूनही जुन्या पुलावरून मार्गस्थ होत आहेत. पावसाळ्यापूर्वी पुलावरून वाहतूक सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 07/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow