खबरदार इफेक्ट : उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार कशेडी बोगदा बॅरीकेट्सची उंची वाढली

Jun 8, 2024 - 10:28
 0
खबरदार इफेक्ट : उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार कशेडी बोगदा बॅरीकेट्सची उंची वाढली

रत्नागिरी : कशेडी बोगद्यातून जाण्यास अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. यासाठी फक्त हलकी वाहने जातील या उंचीची बॅरीकेट्स लावण्यात आली होती. मात्र यामधून रुग्णवाहिका देखील जात नव्हती. याबाबतचे वृत्त रत्नागिरी खबरदार मधून प्रसिद्ध करण्यात येताच त्याची दखल पालकमंत्री उदय सामंत व सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून घेण्यात आली व दोघांकडून बॅरीकेट्सची उंची वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यानुसार आज हि उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे आजपासून कशेडी बोगद्याच मार्ग रुग्णवाहिकांसाठी खुला झाला आहे. मंत्री उदय सामंत आणि मंत्री रवींद्र चव्हाण या दोघांकडून दाखवलेल्या या तत्परते बद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow