रत्नागिरी : तालुक्यातील राई रायकरवाडी येथे वद्धाने अज्ञात कारणातून आंबा बागेतील आंब्याच्या फांदीला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना २४ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० ते बुधवार १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. कालावधीत घडली आहे.
देवीदास रत्नू रायकर (६०, रा. राई रायकरवाडी, रत्नागिरी) असे गळफास घेतलेल्या वृद्धाचे नाव आहे. देवीदास रायकर हे २४ डिसेंबर रोजी दुपारी नातेवाईकांना मी मंदिरात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. परंतु, ते उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेऊन ग्रामीण पोलिस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची खबर दिली होती. दि. १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. सुमारास त्यांच्या नातेवाईकांना धर्माजी रायकर यांची धार या ठिकाणी असलेल्या आंब्याच्या बागेतील झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत देविदास रायकर दिसून आले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 17/Jan/2025
