रत्नागिरी जिल्ह्यासाठी बांधकाम विभागाला ९६ कोटींचा निधी

Jun 26, 2024 - 12:14
Jun 26, 2024 - 12:32
 0
रत्नागिरी जिल्ह्यासाठी बांधकाम विभागाला ९६ कोटींचा निधी

रत्नागिरी : गेले वर्षभर ठेकेदारांना विविध विकासकामांचे पैसे मिळत नसल्याने ठेकेदार मेटाकुटीला येऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीदरम्यान, ठेकेदारांचे पैसे देण्याचे आश्वासन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले होते. त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी जवळपास ९६ कोटींचा निधी बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. त्यामुळे छोट्या ठेकेदारांची बिले भागवली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत, शासकीय इमारती, रस्ते, पूल, नळपाणी योजना व अन्य विकास कामे सुरु आहेत. यापोटी जिल्हयाची कोट्यवधीची बिले झाली आहेत. मागील एक वर्षापासून जिल्हयातील छोट्या व मोठ्या ठेकेदारांची कोट्यवधीची बिले रखडली आहेत. छोट्या ठेकेदारांचीही काही लाखांची बिले रखडली असल्याने ते मेटाकुटीला आहेत. यापूर्वीही ठेकेदारांकडून बांधकाम मंत्र्यांना बिलांसाठी निधी देण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

यात पुलाकरिता १८ कोटी तर अन्य कामांसाठी ७८ कोटींचा निधी बांधकाम मंत्र्यांनी उपलब्ध करुन दिला आहे. निधीचे वितरण होताना यात राजकीय हस्तक्षेप होण्याची भिती छोट्या ठेकेदारांकडून व्यक्त होत होती. मात्र, बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्राधान्याने छोट्या ठेकेदारांचा समावेश निधी वाटप करताना करावा असे निर्देश बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 26/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow