चिपळूण : परशुराम घाटात दरडी कोसळण्याचा धोका
चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी येथील धोका मात्र कायम आहे. काही दिवसांपूर्वीच येथील दरडीकडेचा मातीचा भराव व संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. आतातर काही ठिकाणी डोंगर भागातील भलेमोठे दगड कोसळण्याच्या स्थितीत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. येथे संरक्षक भिंत नसल्याने हे दगड रस्त्यावर येऊन अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी यांनी या ठिकाणी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
परशुराम घाटातील पेण कार्यकारी अभियंता यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या भागातून अतिवृष्टी काळात मोठमोठे दगड खाली येऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी मुंबईकडे जाणारा मार्ग येथील भाग खचल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी संरक्षक भिंत बांधलेली नाही. डोंगरामध्ये खोदकाम करताना टप्पेही दिलेले नाहीत. आत्तापर्यंतच्या पावसात हे दगड मुक्त झाले असल्याने धोका वाढला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 27/Jun/2024
What's Your Reaction?