रत्नागिरीत साकारणार महाराष्ट्रातील पहिले ध्यानकेंद्र
रत्नागिरी : शहरातील संसारे उद्यानामध्ये ४० फूट उंचीची भगवान गौतम बुद्धांची ध्यानस्थ मूर्ती असलेले ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणाऱ्या या ध्यानकेंद्रासाठी २० कोटी रुपये खर्च येणार आहे.
पालकमंत्री सामंत यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी विशेष पावले उचलली आहेत. मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ उभारलेली शिवसृष्टी, जिजामाता उद्यानात संभाजींचा पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि स्वा. सावरकर पुतळ्याजवळ म्युरल्स उभारण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर शहर सुशोभीकरणाची विविध कामे सुरू असल्यामुळे रत्नागिरी सुंदर शहर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरेल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी शहरातील संसारे उद्यानात ध्यानकेंद्र उभारण्यात येणार आहे. या ध्यानकेंद्राचे काम हे नगर परिषदेच्या अखत्यारित असून, स्थानिक कंपनीला याचा ठेका देण्यात आला आहे. या कामाला एक वर्षाची मुदत असून, सुमारे २० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. - तुषार बाबर, मुख्याधिकारी, नगर परिषद, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:37 PM 20/Sep/2024
What's Your Reaction?