देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालयाला मंजुरी, पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
![देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालयाला मंजुरी, पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202407/image_870x_66855e2035f15.jpg)
रत्नागिरी, दि. 3 (जिमाका) देशातील पहिले सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय रत्नागिरीत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्याला मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
दूरदूश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काही महिन्यापूर्वी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्या वेळी रत्नागिरी येथे सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी करण्यात आली होती. मुख्यमंत्री महोदयांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना आज मंजुरी देत त्या पूर्ण केल्या आहेत. सागरी महाविद्यालयाला 500 ते 600 कोटी तसेच विधी महाविद्यालयाला 25 कोटी खर्च येणार आहे. त्यालाही तत्वत: मान्याता दिली आहे. समुद्रावर अभ्यास संशोधन करायचे असेल तर, रत्नागिरीत आता संधी उपलब्ध झाली आहे. ही जिल्ह्याच्या दृष्टीने मानाची बाब आहे. त्यासाठी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याचेही ते म्हणाले.
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)