Ratnagiri : पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी एसटीच्या ७०६ फेऱ्या रद्द
रत्नागिरी : पावसामुळे एसटीची वाहतूक विस्कळित झाली. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात ७०६ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या तसेच शाळांनाही सुट्टी असल्याने फेऱ्या बंद ठेवाव्या लागल्याची माहिती एसटी विभाग नियंत्रकांनी दिली.
मंडणगड ७६, दापोली २२, खेड ३८, चिपळूण १०४, गुहागर ९४, देवरूख ८२, रत्नागिरी १२३, लांजा ७८, राजापूर ८९ अशा ७०६ फेऱ्या रद्द केल्या. या फेऱ्यांचे १६ हजार ८९ किलोमीटर रद्द करण्यात आले. अतिपाऊस, पूरपरिस्थितीमुळे एसटीच्या फेऱ्या बंद करण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 10-07-2024
What's Your Reaction?