रत्नागिरी : मुरुगवाडा येथे विहिरीत बुडून मुलाचा मृत्यू
रत्नागिरी : शहरातील मुरुगवाडा येथील अल्पवयीन मुलगा विहिरीच्या पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आसिफ लतीफ शेख (वय १३, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा खेळत असताना विहिरीच्या पाण्यात पडला. नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचा शोध घेतला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:34 13-07-2024
What's Your Reaction?