शेल्डी धरणाच्या प्रवाहातून तरुण गेला वाहून
खेड : तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण वाहून गेल्याची घटना घडली. धक्कादायक म्हणजे तिघांच्या डोळ्यांदेखत हा तरुण वाहत चालला होता. मात्र, प्राण्याच्या प्रवाहासमोर त्यांचं काही चाललं नाही. या घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणाच्या प्रवाहातून एक 32 वर्षीय तरुण रविवारी दुपारी वाहून गेला असून त्याची शोध मोहीम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. जगबुडी नदी आणि नारंगी नदीला देखील पूर आला आहे. अशा पार्श्वभूमीवर सर्व महत्त्वाच्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील शेल्डी धरणातून जयेश रामचंद्र आंब्रे हा 32 वर्षाचा युवक पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवाहातून वाहून गेल्याची घटना घडली आहे. त्याची शोधमोहीम रविवारी दुपारपासून सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 15-07-2024
What's Your Reaction?