चिपळूण : विहिरीत अडकलेल्या मगरी पिल्लाला जीवदान
चिपळूण : शहरातील वाणी आळीतील एका विहिरीत पुराच्या पाण्याबरोबर मगरीचे पिल्लू आले होते. पुराचे पाणी ओसरल्यानंतर त्याला बाहेर पडता आले नाही. या घटनेची माहिती वन विभागास दिल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना या मगरीच्या पिल्लास पिंजऱ्यात जेरबंद केले. त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.
रविवारी रात्री नदीच्या पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने पाण्याच्या प्रवाहातून एक मगरीचे पिल्लू शहरातील वाणीआळी येथील राम मंदिराच्या मागे असलेल्या श्रीधर मलोसरे यांच्या विहिरीत आले. पुराच्या पाण्याचा निचरा झाल्यानंतर मगिरीचे पिल्लू तेथेच राहिले. त्याला वरती येता येत नव्हते. विहिरीत मगर असल्याचे श्री. मालुसरे यांना सोमवारी १५ रोजी सकाळी निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्यानुसार विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल राजश्री कीर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. मालुसरे यांच्या विहिरीत मगर पकडण्यासाठी पिंजरा सोडण्यात आला होता. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर बुधवारी १७ रोजी विहिरीत असलेली मगर पिंजऱ्यात जेरबंद झाली. नंतर या पिल्लाला अधिवासात सोडण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 18/Jul/2024
What's Your Reaction?