रत्नागिरी : गोवंश हत्या प्रकरणातील आरोपीची अटकपूर्व जामिनासाठी धाव
रत्नागिरी : गोवंश हत्या प्रकरणातील आरोपी शादाब बलबले याला गोवंशची मान मिळाल्याप्रकरणी जामीन मिळाला. वेतोशी येथे त्याने ठेवलेल्या बेकायदेशीर गायींसंदर्भात दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्हाप्रकरणातील आरोपीने अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
मिरजोळे रेल्वेस्टेशन दरम्यानच्या रस्त्यावर गोवंशची कापलेली मान मिळाली होती. याप्रकरणी क्रांतीनगर येथील शादाब बलबले याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. गेल्या सोमवारीच न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. गुन्हा गंभीर आणि संवेदनशील असल्याने आरोपीला जामीन मिळू नये, यासाठी ग्रामीण पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर हा आदेश रद्द व्हावा, यासाठी पोलिसांकडून अपील दाखल करण्यासाठी लागणारी पूर्वप्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीने वेतोशी येथे गुरे ठेवली असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बेकायदेशीर गुरे बाळगल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी आरोपीने न्यायालयात धाव घेतली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 22-07-2024
What's Your Reaction?