Ratnagiri : हातीसचा पीर बाबरशेख दर्गा पुराच्या पाण्याखाली
रत्नागिरी : सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रसिद्ध असलेल्या हातीस येथील पीर बाबर शेख बाबांच्या दर्गा पाण्याखाली गेला.
दर्ग्यात पुराचे पाणी घुसल्याने भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हातीस गावातील ग्रामस्थांनी सर्वांना वेळीच सतर्क केल्याने पुढील अनर्थ टळला.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांत दुसऱ्यांदा हरचेरी, चांदेराई, इब्राहीमपट्टण,. हातीस आदी भागात पूर आला आहे. काजळी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुराचे पाणी गावात आणि बाजारपेठेत घुसले. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
हवामान विभागाने कोकणात लाल बावटा जारी केल्याने पुढील काही तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 22-07-2024
What's Your Reaction?