पेरलेल्या भाताला फुटले अंकुर

Jun 17, 2024 - 09:41
 0
पेरलेल्या भाताला फुटले अंकुर

चिपळूण : शेतकऱ्यांनी सूर्याच्या रोहिणी नक्षत्रावर पेरणीला सुरुवात केली. त्यानंतर मृग नक्षत्रात पडलेल्या सरींमुळे पेरलेल्या धान्याला चांगले अंकुर फुटले आहेत. वाफसे उत्तम उगवल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

काही ठिकाणी पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. पेरणी करून शेतकरी आता पुढील शेतीच्या कामांसाठी सज्ज आहे; मात्र अजूनही जमीन पूर्णपणे ओली झालेली नाही. अनेक ठिकाणी नांगरण्यासाठी शेत उपयुक्त नाही. त्यासाठी मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.

चांगले वाफसे उगवल्यामुळे शेतकरीही समाधानी आहे. काही वेळा जोरदार पाऊस पडला तर पेरलेले धान्यसुद्धा पाण्याबरोबर वाहून जाते आणि पुनश्च पेरणी करण्याची शेतकऱ्यांवर वेळ येते; परंतु यंदा पेरणीनंतर उत्तम वाफसे उगवले आहेत. आता बळीराजा शेतीच्या पुढील कामांसाठी सज्ज झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 17-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow