मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा.... : बिपीन बंदरकर
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आज रत्नागिरीत विविध पक्षांकडून आंदोलने करण्यात आली. यामध्ये राज्यात सत्तेत असलेल्या भाजप ने देखील आंदोलन करीत रोष व्यक्त केला. याचवेळी उबाठा कडून देखील आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी भाजप पक्षावर देखील आंदोलन करण्याची वेळ येतेय यासारखी दुर्दैवाची दुसरी गोष्ट नाही अशी टीका उबाठा चे तालुकप्रमुख बंड्या साळवी यांनी केले. तर सत्ताधारी मित्र पक्षाच्या आंदोलनावर पालकमंत्री उदय सामंत यांनी संयमी प्रतिक्रिया दिली. आंदोलन करण्याचा प्रत्येकाला आधिकार आहे. निदान या योगाने झाडे लावा झाडे जगवा ही भूमिका माझ्या मित्रपक्षाने घेतली याबाबत आकस असण्याचे काय कारण? काही लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवलेत याची मला पूर्ण कल्पना आहे; याच भावनेतून ही आंदोलने होत असतील असे ते म्हणाले.
रत्नागिरी शहरातील रस्त्यांप्रमाणे मुंबई गोवा महामार्गाची देखील दुरावस्था झाली आहे. मागील १७ वर्षापासून या महामार्गाचे काम सुरू आहे, कोकणी जनता यामुळे देखील कमालीची त्रस्त आहे. असे असताना या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत जेव्हा आम्ही आंदोलन करू तेव्हा देखील सामंत साहेबांसारखी संयमी भूमिका भाजप ने घ्यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:50 25-07-2024
What's Your Reaction?