Ratnagiri : जिल्ह्यात 'आरटीई'च्या २४२ जागा राहणार रिक्त

Jul 30, 2024 - 10:50
 0
Ratnagiri :  जिल्ह्यात  'आरटीई'च्या २४२ जागा राहणार रिक्त

रत्नागिरी : शिक्षण हक्क कायदांतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झाली आहे. ऑनलाईन सोडत निघाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील ८१२ जागांसाठी ५७० जणांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी २४२ रिक्त राहण्याची शक्यता आहे. यादीत निश्चित झालेल्यांना ३१ जुलैपर्यंत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली आहे.

आरटीई अंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश देण्यासंदर्भात खासगी शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी मागील दीड महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने १९ जुलै रोजी

आरटीई प्रवेश पद्ध‌तीत बदल करण्यासाठी काढलेली अधिसूचना न्यायालयाने रद् ‌केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक वर्षाला दीड महिन्याचा कालावधी लोटला तरी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली नसल्याने पालक, विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते. आता मात्र मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात ९७ शाळांमध्ये ८७२ जागा आहेत. यासाठी ७७७ अर्ज दाखल झाले होते. याची छाननी करण्यात आली. यानंतर ५७० अर्ज वैध तरवण्यात आले. यामुळे या सर्वांची यादी २२ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आरटीई २५ टक्के प्रवेश मिळाल्याचा एसएमएस प्राप्त झालेल्या पालकांनी ३१ जुलै पर्यंत प्रवेश घेण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

जिल्ह्यात आरटीईच्या यादीत ५७० जणांचा लॉटरी पद्धतीने समावेश करण्यात आला. यामुळे आता २४२ जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. या जागांसाठी शासन पुन्हा मुदतवाढ देणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था आहे. कारण अगोदरच दीड महिना या प्रक्रियेला उशीर झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 30/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow