....या कारणाने रत्नागिरीतील 'त्या' वकिलाची आत्महत्या; पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती उघड

Aug 3, 2024 - 10:30
 0
....या कारणाने रत्नागिरीतील 'त्या' वकिलाची आत्महत्या; पोलिसांच्या प्राथमिक तपासात माहिती उघड

रत्नागिरी : चांगले शिक्षण घेऊनही वकिलीच्या केसेस कमी मिळत असल्याच्या नैराश्यातून अॅड. सौरभ सोहनी (वय ३२) यांनी भाट्ये पुलावरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाली आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी सौरभच्या काही मित्रांची आणि घरमालकाची चौकशी केली आहे. मूळचा राजापूरचा असलेला सौरभ थिबा पॅलेस येथे काही मित्रांसोबत पेईंग गेस्ट म्हणून राहात होता. सोमवार २२ जुलै रोजी रात्री जेवायला जातो, असे तो मित्राची दुचाकी घेऊन रूममधून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने व्हॉटसअॅपच्या स्टेटसवर माझ्या मृत्यूला फक्त मी जबाबदार आहे. माझी शेवटची इच्छा म्हणून कृपया माझ्या मित्रांची, नातेवाईकांची, रुममालकांची चौकशी करू नये, अशा विनंतीचा स्टेटस ठेवला होता. ही बाब त्याच्या मित्रांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने सौरभचा शोध सुरु केला. परंतु २३ जुलै रोजी खडपेवठार येथील किनारी त्याचा मृतदेह सापडला होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 03-08-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow