रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांवर तात्पुरते कारपेट पॅच
रत्नागिरी : पावसाने उसंत घेतली असतानाच ऊनही पडत असल्याने रत्नागिरी शहराच्या मुख्य रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला वेग आला आहे. आता एक एक खड्डा भरला जात नसून खड्डे पडलेल्या ठिकाणी तात्पुरता कारपेटचा पॅच मारले जात आहेत.
पावसाळ्यानंतर आवश्यक त्या ठिकाणी पूर्ण डांबरीकरण होणार आहे. येत्या तीन दिवसांत मारुती मंदिरपासून आठवडा बाजारच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील सर्व खड्ड्यांवर डांबर-खडीचा पॅच मारण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवले जाणार आहेत. सध्या मारुती मंदिरपासून कारपेट पॅच मारण्यासह रामआळीतील खड्डेही भरले जात आहेत. पावसाळ्यानंतर मारुती मंदिर ते जयस्तंभ काँक्रीटीकरण काम सुरु होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 12-08-2024
What's Your Reaction?