कॅनिंग आंबा दर अजूनही स्थिर
![कॅनिंग आंबा दर अजूनही स्थिर](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202405/image_870x_66517d6b3f798.jpg)
रत्नागिरी : अवकाळी पावसामुळे कॅनिंग आंबा दरात कोणतीही वाढ झालेली नाही. दीड महिन्यापूर्वी कॅनिंग आंब्याच्या किलोचा दर ३२ रुपये होता. तो ५० रु. किलो दरावर पोहोचला असून अजूनही तो दर कायम आहे. पाऊस पडल्याने आणखी पुढील आठवडाभर कॅनिंग आंबा खरेदी सुरू राहणार असल्याचे कॅनिंग आंबा घेणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रत्नागिरी जिल्ह्यात मिरजोळे औद्योगिक क्षेत्रातील एक्सॉटिक कंपनीसह छोट्या-मोठ्या २५ कंपन्यांमध्ये कॅनिंगचा आंबा घेतला जातो. सध्या पूर्व मौसमी पावसाने हजेरी लावली आहे. पुढे काही दिवसांतच हा पाऊस नियमित होण्याची शक्यता असल्याने अजून आठवडाभर कॅनिंग आंबा खरेदी प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे. नियमित पावसातील आंबा खरेदी कॅनिंग कंपन्यांकडून केली जात नाही. पूर्व मौसमी पावसामुळे कॅनिंग कंपन्यांकडे येणाऱ्या आंब्यांची आवक कमी आहे. तरीही ५० रुपये किलोचा दर अजूनही कायम असल्याचे एक्सॉटिक कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 25-05-2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)