राजापूर : ओणी-अणुस्कुरा मार्गावरील खड्डे भरण्यास प्रारंभ
राजापूर : तालुक्यातील ओणी- अणुस्कुरा मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालक पुरते त्रस्त झाले आहेत. रस्त्यातील खड्डे चुकवताना काहीवेळा अपघातासारखे बाका प्रसंग निर्माण होत आहेत. बांधकाम विभागाचे लक्ष वेधले होते. त्याची तत्काळ दखल बांधकाम विभागाने घेतली. कालपासून जांभ्या दगडाच्या साहाय्याने खड्डे बुजवण्याला सुरुवात करण्यात आली आहे.
तालुक्यातील पाचल भागातील गावांना जोडण्यामध्ये ओणी-अणुस्कुरा मार्गाची भूमिका महत्वाची राहिली आहे. त्याचवेळी कोल्हापूर भागामध्ये जाणारी वाहने याच मार्गावरून जा-ये करत असतात. मुंबई- सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यामध्ये जाणाऱ्या वाहनांचीही संख्या जास्त आहे. गणेशोत्सवाच्या काळामध्ये या रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमुळे वाहनचालकांसह प्रवाशी त्रस्त होऊन गेले आहेत. ओणी, दैतवाडी, सौंदळ, खडीकोळवण, येळवण, रायपाटण, पाचल बाजारपेठ आदी भागांमध्ये रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हे खड्डे चुकवत वाहने चालवताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. जांभ्या दगडाच्या साह्याने खड्डे बुजवण्यास सुरवात केल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 17/Aug/2024
What's Your Reaction?