रेल्वे प्रवासामध्ये तरुण बेपत्ता
लांजा : रेल्वेने मुंबई ते गोवा प्रवास करत असताना झारखंड येथील तरुण आडवली रेल्वेस्टेशन (ता. लांजा) येथे उतरला; मात्र उतरल्यानंतर पुन्हा तो रेल्वेत आलाच नसल्याने त्याच्यासोबत असलेल्या भावाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांत तो बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. सुनील आदम खाखा (वय २६, रा. झारखंड) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. ही घटना १४ जुलैला सकाळी साडेआठच्या सुमारास आडवली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिलसन निस्तार तिर्की (वय २२, रा. झारखंड) याने दिलेल्या तक्रारीनुसार, हे दोघे चुलत भाऊ मुंबई ते गोवा असा कोकणकन्या एक्स्प्रेसने प्रवास करत होते. रेल्वे आडवली येथे १४ जुलैला सकाळी साडेआठच्या सुमारास आली. त्यावेळी सुनील खाखा हा रेल्वेतून उतरला; परंतु उतरल्यानंतर तो पुन्हा आलाच नाही. यामुळे त्याचा भाऊ बिलसन याने बराच वेळ आडवली रेल्वेस्टेशनच्या परिसरात शोधाशोध केली. अखेरीस सुनील खाखा कुठेच मिळाला नसल्याने बिलसन तिर्की याने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर ही माहिती लांजा येथे वर्ग करून सुनील खाखा हा बेपत्ता झाल्याची तक्रार १२ ऑगस्टला लांजा पोलिस ठाण्यात दाखल केली. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 22/Aug/2024
What's Your Reaction?