अचानक पाणीपुरवठा बंद ठेवल्याने शहरवासीयांची गैरसोय
रत्नागिरी : धरणासह जलशुद्धीकरण केंद्रावरच्या देखभाल दुरूस्तीसाठी सोमवारी अचानक रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले. सणासुदीच्या दिवशी सोमवारी पाणी पुरवठा न झाल्याने शहरवासीयांची गैरसोय झाली.
सोमवारी पाणी पुरवठा न करण्याचे नियोजन करण्यात आले त्या संदर्भात रविवारी दुपारनंतर ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात आली होती, असे पाणी पुरवठा विभागाकडून कळवण्यात आले. गणेशोत्सवाला येत्या शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या उत्सवाच्या काळात कोणताही बिघाड होवून पाणी पुरवठ्यात व्यत्यय येवू नये यासाठी अचानक सोमवारी देखभाल दुरूस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार रविवारी दुपारनंतर शहरात ध्वनिक्षेपकावरून सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे कळवण्यात आले. शहरातील अनेक रस्त्यांपासून घरे दूरवरच्या अंतरावर असल्याने अनेकांना पाणी पुरवठा होणार असल्याचे कळलेच नाही. त्यामुळे पाणी न आल्याने अनेकांची गैरसोय झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 03-09-2024
What's Your Reaction?