रत्नागिरी : 'आरटीई'च्या ५१९ जणांचा प्रवेश निश्चित

Sep 3, 2024 - 10:53
 0
रत्नागिरी : 'आरटीई'च्या ५१९ जणांचा प्रवेश निश्चित

रत्नागिरी : गेले दीड महिने रखडलेली आरटीई प्रवेश प्रक्रिया अखेर पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ९७ शाळांमधील ८१२ जागांसाठी ५७० जणांना लॉटरी लागली होती. यापैकी २१ अर्ज अपात्र करण्यात आले. मुदतीत ४८८ जणांचा प्रवेश निश्चित झाला होता. मात्र त्यानंतर या मुदतवाढ देण्यात आली. त्यामध्ये ३१ जणांनी प्रवेश केला आहे. यामुळे आता एकूण ५१९ जणांचा अंतिम प्रवेश निश्चित झाला आहे. तर २९३ जागा रिक्त राहणार आहेत. शिक्षण विभागाने दि. ७ जून रोजी आरटीईची ऑनलाईन सोडत काढण्यात आली होती. परंतु, काही खासगी शाळांनी आरटीई प्रवेशाबाबत न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली. तसेच काही शिक्षक संघटनांनी आरटीई कायद्यातील बदल रद्द करावा, याबाबत याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी आणि निकाल देण्यास विलंब झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक ते दीड महिन्यापासून रखडली होती.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ५७० जणांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती. प्रवेशासाठी मुदतवाढ देऊनही ५१ जणांनी प्रवेश घेतलाच नाही तर २१ अर्ज अपात्र करण्यात आले. यामुळे ४८८ जणांनी अंतिम प्रवेश घेतला होता; मात्र, शासनाने पुन्हा २९ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची मुदतवाढ दिली होती. यानंतर ३१ जणांनी प्रवेश घेतला आहे. यामुळे एकूण ५१९ जणांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 03/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow