रत्नागिरी : धान्याचे कमिशन तातडीने द्या; अन्यथा वितरण बंदचा इशारा
चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने माहे फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्याचे कमिशन धान्य दुकानदारांना दिलेले नसल्याने दुकानदार अडचणीत आहेत. कमिशन देताना शासनाचा चाललेला चालढकलपणा निंदनीय असून तातडीने कमिशन मिळाले नाही तर जिल्ह्यातील सर्व धान्य दुकानदार धान्य वितरण बंद ठेवतील व त्याची जबाबदारी शासनावर राहील, असा इशारा रत्नागिरी जिल्हा रेशनिंग व केरोसिन चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक कदम यांनी दिला आहे.
माहे फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्ट या पाच महिन्याचे प्रती किटल १५० प्रमाणे मिळणारे कमिशन शासनाने दुकानदारांना दिलेले नाही. याबाबत जिल्हास्तरावर मागणी करूनही त्याची दखलही घेतली जात नाही.
त्यामुळे दुकानदारांना सतत मोफत धान्य वितरण करून शासन सवंग लोकप्रियतेसाठी दुकानदारांची उपासमार करीत आहे. फेब्रुवारी, मार्च, जून, जुलै व ऑगस्टच्या कमिशन शिवाय सन २०२२ च्या नोव्हेंबर, डिसेंबरचे चलन कमिशन अजूनही जिल्हा पुरवठा खात्याकडून मिळालेले नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 06/Sep/2024
What's Your Reaction?