आता काय काम करणार हे राणेंनी सांगूनच टाकले...

Jun 5, 2024 - 16:00
 0
आता काय काम करणार हे राणेंनी सांगूनच टाकले...

रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचा ४७,८५८ मतांनी दणदणीत विजय झाला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण कोणत्या पद्धतीने काम करणार हे सांगितले. भविष्यात आपण करणार असल्याच्या कामांचा प्राधान्यक्रम सांगताना ते म्हणाले की प्रथम मुंबई गोवा महामार्ग त्यानंतर पिण्याचे पाणी, विमानतळ आणि कोकणातील बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारे उद्योग हे माझ्या कामांचे प्राधान्यक्रम आहेत. मोठ्या आशेने कोकणी जनतेने नारायण राणे यांना निवडून दिले आहे. राणेंच्या माध्यमातून हि सर्व अडकलेली कामे वेगाने पूर्ण होतील अशी अपेक्षा कोकणी माणूस व्यक्त करत आहे. आता निवडून येताच नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या कामांचा प्राधान्यक्रम सांगत कोकणी जनेतेला विश्वास दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:29 PM 05/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow