जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ल्यावर 'भारतीय कष्टकरी रयत सेवा' संस्थेमार्फत वृक्षारोपण

Jun 7, 2024 - 13:48
 0
जिल्ह्यातील रत्नदुर्ग किल्ल्यावर 'भारतीय कष्टकरी रयत सेवा' संस्थेमार्फत वृक्षारोपण

रत्नागिरी : भारतीय कष्टकरी रयत सेवा संस्था यांच्यामार्फत शिवराज्याभिषेक दिन आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज रत्नदुर्ग किल्ला येथे शिवराज्याभिषेक सोहळा आणि वृक्षारोपण करण्यात आले. रत्नदुर्ग किल्ला येथे प्रथम भगवतीदेवीचे दर्शन घेण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून शिवराज्याभिषेक सोहळाविषयक माहिती देण्यात आली. भगवती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर गोपाळ मुंडकर यांच्या परवानगीने आणि उपाध्यक्ष श्रीकांत भास्कर सारंग यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, सचिव श्रीमती अश्विनी मोरे, संचालक पवनकुमार मोरे, भगवती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष सारंग, कर्मचारी व भाकरचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 07/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow