रत्नागिरी : जाकादेवी येथे स्वराज्य भूमीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांची उपस्थिती

Sep 14, 2024 - 10:11
 0
रत्नागिरी :  जाकादेवी येथे स्वराज्य भूमीच्या आंदोलनाला शेतकऱ्यांची उपस्थिती

रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे सत्ताधाऱ्यांचे होणारे दुर्लक्ष, वन्यप्राणी व माकडांवर नियंत्रण, आंबा बागायतदार, मच्छीमारांचे प्रश्न यासह विविध विषयांवर स्वराज्य भूमीने ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले असून, तालुक्यातील जाकादेवी या पंचक्रोशीच्या ठिकाणी केलेल्या आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यानंतर बैठकीत चर्चाही करण्यात आली.

राजापूर तालुक्यातील भू गावामधून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. २०१५ मध्ये कोकणातील शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन करून व्याजमाफी केली होती ती आजपर्यंत दिली नाही; पण आता काही शेतकऱ्यांना व्याजमाफी प्रत्यक्ष मिळाली. ज्यांचे ज्यांचे कर्ज पुनर्गठन केले होते विनाअट व्याजमाफी मिळाली पाहिजे त्या सर्वांना . ठरावीक लोकांना मिळणं पुरेसं नाही. त्यापुढे जाऊन कोकणातील आंबा बागायतदारांनी आजपर्यंत कधीच कर्जमाफी मिळाली नाही; पण एकदा कोकणातल्या आंबा बागायतरांची कर्जमाफी व्हायला हवी ही आमची प्रमुख मागणी आहे. याशिवाय विम्याचे पैसे अजून मिळाले नाहीत ते मिळाले पाहिजेत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी समृद्ध कोकण संघटनेचे संस्थापक संजय यादवराव, सरचिटणीस संदीप शिरधनकर, उपाध्यक्ष
 युयुत्सू आर्ते, सचिव अनिश निमकर, शेतकरी संघटनेचे प्रमुख बावाशेठ साळवी, अजय कोळंबेकर, स्थानिक संयोजक दीपक उपळेकर, विनय मुकादम, मन्सूर काजी आणि शंभरहून अधिक स्थानिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 9/14/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow