राजापूर : आचारसंहितेमुळे आंबेवाडी पूल पावसाळ्यात बंद ठेवण्याची नामुष्की
![राजापूर : आचारसंहितेमुळे आंबेवाडी पूल पावसाळ्यात बंद ठेवण्याची नामुष्की](https://ratnagirikhabardar.com/uploads/images/202406/image_870x_666fdf4b2b182.jpg)
राजापूर : सिंधुरत्न समृद्धी योजनेचे सदस्य तथा युवक नेते किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या शिफारशीतून मंजूर झालेल्या भटाळी येथील आंबेवाडीकडे जाणाऱ्या कोदवली नदीवरील कै. वासुकाका जोशी पुलाचे काम आचारसंहितेच्या कचाट्यात सापडल्याने यंदाच्या पावसाळ्यात हा पूल बंद ठेवण्याची नामुष्की नगर परिषदेवर ओढवली आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी तब्बल ४५ लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता पावसाळ्यानंतरच या पुलाच्या दुरूस्तीचे भवितव्य आहे.
यंदाचे २०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष ठरणार आहे. वर्षातील विकास कामे ज्या कालावधीत होतात, त्या यंदाच्या निवडणूकीच्या आचारसंहितेचा अमल होता, तर त्यानंतर २६ जून रोजी होणाऱ्या पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू आहे. त्यानंतर तीव्र पावसाळी हंगाम व साधारणपणे सप्टेंबर अखेरपासून ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत होऊ घातलेल्या विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंजूर झालेल्या अनेक विकास कामांना खीळ बसली आहे.
यामध्ये भटाळी-आंबेवाडी पुलासोबतच भटाळी येथील रस्त्याच्या कामालाही यंदा फटका बसला आहे. या रस्त्यासाठी श्री. सामंत यांच्या माध्यमातून २० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळालेली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 20/Jun/2024
What's Your Reaction?
![like](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/like.png)
![dislike](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/dislike.png)
![love](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/love.png)
![funny](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/funny.png)
![angry](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/angry.png)
![sad](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/sad.png)
![wow](https://ratnagirikhabardar.com/assets/img/reactions/wow.png)