रत्नागिरीत मुसळ'धार'!
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मागील २ दिवसांत सतत पडलेल्या पावसामुळे खेड येथील जगबुडी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे, तर दुसरीकडे परशुराम घाटातील महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने मुख्य महामार्गालाच धोका निर्माण झाला आहे.
खेड आणि चिपळूण तालुक्यांत जोरदार पाऊस झाला आहे. प्रतिवर्षी पावसाचा पूर्वानुभव लक्षात घेत येथील प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.
चिपळूण जवळील परशुराम घाटात २१ जूनच्या पहाटे ५.३० वाजता संरक्षक भिंत आणि मातीचा भराव कोसळला आहे. संरक्षक भिंत कोसळल्याने मातीचे ढिगारे वाहू लागले आहेत. घाटातील अनुमाने २०० मीटरचा भाग खचला आहे. या घटनेनंतर तात्काळ महामार्गाची एक मार्गिका बंद करण्यात आली असून एकेरी वाहतूक चालू करण्यात आली आहे. पोलीस, प्रशासकीय अधिकारी, तसेच ठेकेदार आस्थापनाचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित झाले आहेत.
खेड तालुक्यातील सोनगावातील भोईवाडीत घरावर संरक्षक भिंत कोसळून घराची हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे भूमी खचून संरक्षक भिंत पुष्पा पारधी यांच्या घरावर कोसळली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 22-06-2024
What's Your Reaction?