एक रुपयात पीकविमा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

Jul 18, 2024 - 14:59
 0
एक रुपयात पीकविमा, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ

साखरपा : एक रुपयात पिकविमा योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या दोन योजनांकडे ग्रामस्थांनी पाठ फिरवली आहे. वारंवार आवाहन करून या योजनांचा लाभ घेण्यास प्रामस्थ पुढे येत नाहीत.

राज्य शासनाची एक रुपयात पिकविमा योजना ही गेल्या वर्षांपासून सुरू झालेली योजना, या योजनेला गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. गेल्या वर्षी अनेक स्थानिक पुढाऱ्यांनी स्वतः एक रुपया भरून काही ग्रामस्थांचे विमे काढले होते. यंदाही या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. गावात कृषी सहाय्यकांकडून वारंवार आवाहन करुनही कोणीही शेतकरी त्याची दखल घेताना दिसत नाहीत. 

काही गावांमधून कृषीसहाय्यकांनी या योजनेची माहिती देण्यासाठी कॅम्प आयोजित केले होते; पण त्या शिबिरांना कोणी शेतकरी आले नाहीत. या योजनेची मुदत १५ तारखेला संपली असली तरीही आता तिला मुदतवाढ देण्यात आलेली आहे; पण तरीही कोणीही शेतकरी हा विमा उतरवण्यास तयार नाही. यंदा पाऊस पडून नुकसान झाले तरीही तलाठी, ग्रामसेवक पाहणी करून पंचनामा करतात आणि नुकसानभरपाई मिळते. असे असतानाही विमा कशासाठी काढायचा, असा प्रश्न शेतकरी विचारत केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेकडेही ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे, ही प्रामुख्याने सुतारकाम करणाऱ्या गावागावातून अन्य लघुउद्योग करणाऱ्यांसाठी आहे; पण त्याचीही ऑनलाइन नोंदणी कोणी करताना दिसत पंचायत समिती स्तरावरून योजनेला मुदतवाढ देण्यात आली गावागावातून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ग्रामस्थांना आवाहन करत आहेत; पण कोणीही नोंदणी करून घेण्यास इच्छुक नाहीत.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 18/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow