पावस येथील कातळसड्यावरील धबधबे पर्यटकांचे बनले आकर्षण

Jun 27, 2024 - 13:49
 0
पावस येथील कातळसड्यावरील धबधबे पर्यटकांचे बनले आकर्षण

पावस : कोकणातील कातळसडे पावसामुळे पुन्हा जिवंत होऊ लागले आहेत. पावसाचे प्रमाण आता हळूहळू वाढू लागले आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस कुंभारघाटी परिसरामध्ये कातळसड्यावरून वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

पाण्याचा अमाप साठा असलेले कातळसडे पाण्याची टंचाई दूर करणारे आहेत. गेल्या काही वर्षात कोकणातल्या अनेक गावांना पाणीटंचाई भासते. कोकणात सर्वच कातळसड्यांवर चाललेल्या अनेक घडामोडी हेच या पाणीटंचाईचे मुख्य कारण असल्याचे जैवशास्त्रज्ञांचे मत आहे. या सड्यावर मोठ्या प्रमाणात होणारे बांधकाम, चिरेखाणींचे वाढलेले प्रमाण यामुळे कातळसड्यांवरील पाण्याच्या स्रोतामध्ये अडथळे येऊ लागले आहेत. याचाच परिणाम म्हणून कातळसड्याच्या उतारावर असणाऱ्या व जवळपासच्या गावातील विहिरींचे पाणी आटायला लागले आहे.

पाण्याचे पारंपरिक पाट नष्ट होत आहेत. उन्हात पाण्याचा पुरवठा करणारी शिवकालीन तळीही आता कोरडी होऊ लागली आहेत; मात्र पावसाळ्यात याच कातळसड्यावर साचणारे पाणी आणि या सड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. प्रचंड प्रवाहाने कोसळणाऱ्या या धबधब्यांखाली अंघोळ करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटन येथे येऊ लागले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:19 PM 27/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow