राजापूर बाजारपेठेत चिखलाचं साम्राज्य

Jul 9, 2024 - 11:16
 0
राजापूर बाजारपेठेत चिखलाचं  साम्राज्य

राजापूर : गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने सोमवारी विश्रांती घेतल्यामुळे रविवारी दुपारपासून तालुक्यातून अर्जुना-कोदवली नद्यांना आलेल्या पुराचे पाणी ओसरले. शहरासह बाजारपेठेचा धोका कमी झाला. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र, शहरातील नद्यांच्या काठावरील भाग, रस्ते अद्यापही पाण्याखाली आहेत. शहरावरील पुराची टांगती तलवार अद्यापही कायम आहे. ५६ लोकांची रेस्क्यू ऑपरेशन करून सुटका करण्यात आली.

गेले दोन दिवस तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पडल्याने अर्जुना-कोदवली नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. दोन्ही नद्यांना काल दुपारी पूर आला होता. काही कालावधीमध्ये पुराचे पाणी बाजारपेठेमध्ये घुसले. शहरातील अनेक भाग पुराच्या पाण्याखाली गेले. शहरातील बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसले होते. पावसाचा जोर कमी न झाल्याने काल सायंकाळी सातत्याने पुराच्या पाण्यामध्ये वाढ झाली. काल सायंकाळनंतर पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे दहा तासांनंतर हळूहळू पूरस्थिती ओसरू लागली होती. सकाळपर्यंत जवाहर चौक परिसर पूर्णपणे मोकळा झाला होता. मात्र, बंदर धक्का परिसर, वरचीपेठ रस्ता, आदी परिसर नद्यांच्या वाढलेल्या पाण्याखाली दिवसभर राहिला. त्या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. पाणी ओसरताच व्यापाऱ्यांनी दुकानातील गाळ आणि चिखलाची साफसफाई करण्याचे काम हाती घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 09/Jul/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow