राजापुरात पुराचा धोका
राजापूर : तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून, शहरातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे शहरवासीयांना पुन्हा एकदा पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्याने पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी विद्युत वाहनीवर झाडे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.
राजापूर डोंगरमार्गे जैतापूर रस्त्यावर झाड पडल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शहरातील मुन्शी नाका परीसरात पाणी रस्त्यावर आल्याने शीळ मार्गावरील वाहतूक ठप्प होती. जोरदार पावसामुळे जवळपास निम्मा तालुका अंधारात गेला आहे. कोंढेतड, राजवाडी, ससाळे केळवली, निखरे, बांदचावाडा, कुवेशी, गुजराळी अशा अनेक भागात विजेच्या तारा तुटून पडल्या आहेत. मिठगवाणे व राजापूर डोंगरमार्गे जैतापूर मार्गावर कणेरी येथे रस्तावरच झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास ठप्प झाली होती. शहरातील मुन्शीनाका येथे वरचीपेठ, शीळकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्जुना नदीचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 15/Jul/2024
What's Your Reaction?