रत्नागिरी : मेर्वीत वादळी पावसाच्या तडाख्यात अडीच लाखांची हानी
पावस : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथे वादळी पावसाच्या तडाख्यात सात जणांच्या घराचे व एकाच्या गोठ्याचे असे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. जोरदार वादळी पावसामध्ये मेर्वी येथील कातळावरील पाच जणांच्या घरावरील कौले उडाली असून, दोघांच्या घरावरील पत्रे उडाले तर एकाच्या गोठ्यावर झाड कोसळून नुकसान झाले.
वादळी पावसाचा आठजणांना चांगलाच फटका बसला असून, नुकसानीचा तलाठ्यांनी पंचनामा केला आहे. यानुसार आठजणांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. पावस परिसरामध्ये पावसाची दमदार हजेरी सुरूच असून परिसरामध्ये ८४ मिलिमीटर पावसाची नोंद एकाच दिवशी झाली आहे. फणसोप परिसरामध्ये १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतीसाठी समाधानकारक पाऊस होत असल्याने भात लावणीच्या कामांनी वेग घेतला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:39 PM 17/Jul/2024
What's Your Reaction?