रत्नागिरी : आठ हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा

Jul 20, 2024 - 15:03
 0
रत्नागिरी : आठ हजार शेतकऱ्यांनी उतरवला पीकविमा

रत्नागिरी : प्रधानमंत्री पिकविमा योजना केंद्र शासनाच्या नियमानुसार राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एकूण ८ हजार ११२ शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत सहभाग घेतला आहे.

२०२४ मध्ये केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर थेट ऑनलाइन स्वरूपात विमा अर्ज भरण्याची सुविधा १६ जूनपासून सुरू केली होती. सहभागासाठी असलेली अंतिम १५ जुलैची मुदत वाढवून आता ३१ जुलै करण्यात आली आहे. १५ जुलैला सकाळी १० पर्यंत या योजनेंतर्गत १ कोटी ३६ लाख विमा अर्जाद्वारे साधारण ९० लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. राज्यात सरासरी खरीप हंगाम पेरणी क्षेत्र १४२ लाख आहे. गतवर्षी म्हणजेच खरीप २०२३ मध्ये पीकविमा अर्ज संख्या १ कोटी ७० लाख होती व विमा संरक्षित क्षेत्र १ कोटी १३ लाख हेक्टर होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:31 20-07-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow