Kolhapur : पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली
कोल्हापूर : जिल्ह्यात काल, रविवारी सकाळपासून धुवाधार पावसामुळे पुराचे पाणी वाढू लागले आहे. आज, सोमवारी पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने कोल्हापूरकरांची धाकधूक वाढली आहे. पावसाचा जोर आणि धरणातून होणारा विसर्गामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थलांतराची तयारी सुरू केली आहे.
'राधानगरी' ८०, तर 'वारणा' ७२ टक्क्यांवर
धरण क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्याने जलाशयात झपाट्याने वाढ होत आहे. आतापर्यंत 'जांबरे', 'घटप्रभा', 'जंगमहट्टी', 'आंबेओहोळ' ही चार धरणे भरली आहेत. 'कडवी' ९५ टक्क्यांवर असून, ते कोणत्याही क्षणी भरू शकते. राधानगरी धरण ८० टक्के, तर वारणा ७२ टक्के भरले आहे. आणखी दोन दिवस असाच पाऊस सुरू राहिला; तर दोन्ही धरणे भरण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्याला महापुराला सामाेरे जावे लागणार आहे.
म्हणूनच पुराचे पाण्याला संथगती
'राधानगरी', 'दूधगंगा', 'वारणा' ही धरणे भरलेली नाहीत. 'राधानगरी' व 'वारणा'तून वीजनिर्मितीसाठीच विसर्ग सुरू आहे. त्यात अलमट्टीतून विसर्ग प्रतिसेंकद सव्वा लाख घनफूट सुरू असल्याने पुराचे पाणी संथगतीने वाढत आहे. त्यामुळेच रविवारी दिवसभरात 'पंचगंगे'ची पातळी अवघ्या दोन इंचांनी वाढली आहे.
आठवडी बाजारावरही परिणाम
कोल्हापूर शहरात रविवारी आठवडी बाजार असतो; पण दिवसभर सुरू असलेल्या संततधारेमुळे नागरिकांना घरातून बाहेर पडता येत नव्हते. त्यामुळे बाजारावरही पावसाचा परिणाम जाणवत होता.
- बंधारे पाण्याखाली : ७८
- पंचगंगेची पातळी : ३९.२ फूट
- राज्य, प्रमुख जिल्हा व ग्रामीण मार्ग बंद : ३३
- पडझड : ८ घरे ( सुमारे ६ लाखांचे नुकसान)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:08 22-07-2024
What's Your Reaction?