गुहागरमध्ये पावसामुळे ८५ हजारांचे नुकसान
➡️ गुहागर : गेले चार दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच वादळी वाऱ्यामुळे तालुक्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले आहे. २१ जुलैला वादळी वाऱ्यामुळे ८५ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली. मौजे वेळणेश्वर येथील श्रीमती शैलजा महेश गोखले यांच्या हॉटेलचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडून गेले. यात हॉटेलचे व त्यातील खाण्याचे साहित्य, रेशन वगैरे यांसह सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले. मौजे कोंडकारूळ येथील विश्वास मोहन पावसकर यांच्या राहत्या घराची पडवी पडून अंदाजे १२ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मौजे वरचापाटतर्फे येथील श्रीमती अमिता आनंद खरे यांचे गोठ्याचे छत कोसळून त्यांचे सुमारे २५ हजारांचे नुकसान झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 23-07-2024
What's Your Reaction?