लांजा : नुकसानीचे पंचनामे तातडीने करा : आ. राजन साळवी
लांजा : अतिवृष्टीमुळे तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून नुकसानग्रस्त ग्रामस्थांना मदत कराव्यात, अशा सूचना आमदार राजन साळवी यांनी तहसीलदार प्रमोद कदम यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केल्या.
मागील काही दिवसांपासून संपूर्ण कोकणपट्टीत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून त्यामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. लांजा तालुक्यात आजवर अनेक ग्रामस्थांच्या घरे, गोठे यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार राजन साळवी यांनी लांजा तालुक्याच्या समस्यांबाबत लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्या समवेत बैठक घेऊन तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून नागरिकांना मदत करावी. तसेच महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बद्दल येणाऱ्या समस्येवर योग्य उपाययोजना करणे.
त्याचप्रमाणे दाखल्यासाठी नागरिकांना होणाऱ्या विलंबावर तात्काळ कारवाई करावी व रेशनकार्ड, रेशन दुकानबाबत येणाऱ्या तक्रारीचे ताबडतोब निरसन करून नागरिकांना दिलासा द्यावा. तसेच तालुक्यातील क्रशरमुळे होणाऱ्या रस्त्याची दुर्दशा पाहता त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी अशा सूचना देण्यात दिल्या. दरम्यान, या बैठकीला क्रशर मालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 29/Jul/2024
What's Your Reaction?