अमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे : धीरज घोसाळकर
गुहागर : अमलीपदार्थांमुळे अनेक तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक जीवन पूर्णतः निष्क्रिय होत आहे. त्यामुळे अंमली पदार्थांपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे. व्यसनाधीनता भारत देशाला शाप आहे, असे मत धीरज घोसाळकर यांनी व्यक्त केले.
दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक विद्यालय व भगिर्थीबाई सुदाम पाटील ज्युनिअर कॉलेज अंजनवेल या विद्यालयात डॉ. तात्यासाहेब नातू स्मृतिदिन निमित्त व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या आहेत. यातील पहिले विचार पुष्प टी. डब्लू. जे. या कंपनीचे धीरज घोसाळकर यांनी गुंफले. यावेळी धीरज घोसाळकर, द्वीप कचरेकर, स्नेहल कदम, नूतन चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
यावेळी धीरज घोसाळकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. ते म्हणाले, देशातील तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे. देशात अनेक प्रकारे अमलीपदार्थांची तस्करी करून विद्यार्थी वर्गाला व्यसनाधीन बनवले जात आहे. आज आपण सर्वांनी अंमली पदार्थ विरोधात लढल्या जाणाऱ्या लढाईत सहभागी होणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे असे सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. सूत्रसंचालन प्रा. उमेश जाधव यांनी केले तर शावरी बंदिछोडे यांनी आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:24 PM 30/Jul/2024
What's Your Reaction?