रत्नागिरीतील 'शिवरुद्रा' पथकाने राजस्थानातील नागरिकांना केले मंत्रमुग्ध
रत्नागिरी : शहरातील शिवरुद्रा ढोल-ताशा पथकाने नुकतेच राजस्थानमधील फालणा येथे वादन करून येथील नागरिकांना मंत्रमुग्ध केले. फालणा येथील एका महाविद्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी शिवरुद्रा पथकाला वादनासाठी खास आकर्षण म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
रत्नागिरी शहरातील शिवरुद्रा ढोल-ताशा पुणेरी पथकाने आपल्या वादनाच्या जोरावर पथकाचे नाव जिल्ह्याभरात पोहोचवले. शहरातील तसेच जिल्ह्यातील अन्य घरगुती, सार्वजनिक गणपती मंडळांकडून शिवरुद्रा पथकाला वादनासाठी दरवर्षी आमंत्रित करण्यात येते. शिवरुद्रा पथकाने याआधी महाराष्ट्राबाहेर तामिळनाडूतील चेन्नई, आंद्रप्रदेशमधील पीठापुरम तसेच गुतरातमधील राजकोट येथे दमदार वादन करून रत्नागिरीची एक वेगळी सांस्कृतिक ओळख करून दिली आहे. अल्पावधीतच आपल्या वादनाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या शिवरुद्रा ढोल-ताशा पथकाने रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वादनाबरोबरच या पथकाच्या वर्धापनदिनानिमित्त सामाजिक उपक्रमही राबवण्यात येतात. शिवरुद्रा पथकात सध्या १२० वादक आहेत. येत्या सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी शिवरुद्राकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून, या पथकात सहभागी होण्यास कोणी इच्छुक असल्यास त्यांनी रुपेश पेडणेकर, राजीव देवळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:12 PM 31/Jul/2024
What's Your Reaction?