कोल्हापुरात पावसाची उघडझाप; पूर पाणीपातळीत घसरण
कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाची उघडझाप राहिली. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्याने राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सद्या धरणातून प्रतिसेकंद १५०० घनफूट विसर्ग सुरु आहे.
पडझडीत २२ लाखांचे नुकसान
जिल्ह्यात रविवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ७५ खासगी मालमत्तांची पडझड झाली आहे. यामध्ये २२ लाख २३ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
पाणी संथगतीने कमी
दिवसभरात पाऊस कमी झाला असला, तरी पुराचे पाणी एकदम संथगतीने कमी होत आहे. रविवारी दिवसभरात केवळ ६ इंचांनी पुराचे पाणी कमी झाले होते.
दृष्टिक्षेपात पाऊस :
सध्याची पातळी : ४०.५ फूट
बंधारे पाण्याखाली : ५८
मार्ग बंद : ५५
नुकसान : ७५ मालमत्ता
नुकसानीची रक्कम : २२ लाख २३ हजार
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:25 05-08-2024
What's Your Reaction?