रत्नागिरी : भंडारी समाजाच्या ऐक्यासाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी सहस्र बिल्वपत्र अभिषेक
रत्नागिरी : येथील भागेश्वर मंदिरात भंडारी समाजाच्या ऐक्यासाठी आणि सर्वांगीण प्रगतीसाठी सोमवारी पहाटे श्रावण मासारंभी समाजाचे दैवत दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे स्मरण करून श्री भागेश्वराला सहस्र बिल्वपत्र अभिषेक करण्यात आला.
समाजाचे एकीकरण होऊन समाजकार्य पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक समाजबांधवाला ताकद पुरवून समाजाच्या महापुरुषांचा नावलौकिक वाढावा. सर्वांचे आरोग्य चांगले राखून उद्योग व्यवसायात भरभराट व्हावी, अशी भागेश्वरचरणी प्रार्थना करण्यात आली.
या अभिषेकासाठी भागोजीशेठ कीर यांचे पणतू ओंकार विवेक कीर, मुंबईचे उद्योजक आशीष पेडणेकर, रत्नागिरी भंडारी समाजाचे अध्यक्ष राजीव कीर, नितीन तळेकर, दिलीप भाटकर, सौ. अस्मिता चवंडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 06-08-2024
What's Your Reaction?