'नवभारत साक्षरता' कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा विरोध

Aug 6, 2024 - 12:14
Aug 6, 2024 - 17:16
 0
'नवभारत साक्षरता' कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा विरोध

रत्नागिरी : नवभारत साक्षरता कार्यक्रम याला राज्य, जिल्हास्तरावर प्रखर विरोध केला आहे. तो शिक्षकांनी बहिष्काराला पाठिंबा देऊन आपली एकी दाखवावी, प्रशासन जे लक्ष्य देत आहे आणि काम करून घेत आहे त्याला विरोध करावा. संघटना सर्वांच्या पाठीशी ठाम राहील, असे कोकण विभागीय अध्यक्ष बलीराम मोरे यांनी सांगितले.

खारवी समाज सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी तालुकाध्यक्ष तसेच प्राथमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष व माजी संचालक नितीन शिंदे यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल सन्मान केला. या वेळी संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी सेवानिवृत्त शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.

बीएलओ कामाला जिल्हा व राज्यस्तरावर विरोध आहे. त्यानुसार जिल्हा संघटनेचा प्रखर विरोध करणार असल्याचे जाहीर केले, शिक्षकांना शैक्षणिक कामापासून लांब ठेवणाऱ्या कामातून मुक्तता करावी आणि विद्याथ्यारंचे होणारे शैक्षणिक नुकासन टाळावे अशी आग्रही मागणी सरकारकडे केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमाला समिती कोकण विभागीय अध्यक्ष बळीराम मोरे, समिती जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, बांडागळे गुरूजी, पदवीधर संघटना सरचिटणीस माळी, कास्ट्राईबचे संजय तांबे, मनोज खानविलकर, प्रभाकर खानविलकर, राजेश शिर्के, अरविंद जाधव, पंकज जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष ढोले यांनी केले.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:42 PM 06/Aug/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow