रत्नागिरीत पावसाचा जोर ओसरला
रत्नागिरी : जिह्यात जुलैमध्ये दमदार सातत्य राखणाऱ्या पावसाचा जोर ऑगस्ट महिन्यात श्रावणमास सुरू झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे.
अनेक भागात ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला असून, काही भागात पावसाने उघडीप घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर गुरुवारी सकाळपासूनच ओसरेला होता. गुरुवारी दिवसभरात पावसाची एखाददुसरी सरींची ये-जा सुरू होती. त्यामुळे तापमानातही वाढ झाली.
गुरुवारी दिवसभर मळभी वातावरण होते. मात्र, पावसाचा जोरही कमी होता. तापमानातही घट झाली होती. पुढील काही दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढून पाऊस जोरदार सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गुरुवारी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात २०.९२ मि.मी. च्या सरासरीने १८८.३० मि.मी. एकूण पाऊस झाला. यामध्ये मंडणगड तालुक्यात केवळ ६.२० मि.मी पावसाची नोंद झाली. दापोली ११.६०, खेड २०.३०, गुहागर २०.३०, गुहागर ९.३०, चिपळूण २८.१०, संगमेश्वर ३७.३०, रत्नागिरी १४.८०, लांजा ३०.४० आणि राजापूर तालुक्यात ३०.२० मि.मी. पावसाची नोंद झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 09-08-2024
What's Your Reaction?