रत्नागिरी : महाविद्यालयीन युवकाचा धरणात बुडून मृत्यू
गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड मराठवाडी येथील धरणामध्ये युवक बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. पार्थ राजेंद्र राणे (वय १७, रा. दत्त मंदिरच्या पाठीमागे, मालगुंड) असे त्याचे नाव आहे.
पार्थ हा इयत्ता बारावी सायन्समध्ये रत्नागिरी येथे फाटक महाविद्यालयात शिक्षण घेत होता. गुरुवारी मालगुंड येथे आल्यानंतर तो आपल्या चार मित्रांसोबत पोहण्यासाठी मालगुंड मराठवाडी येथील धरणात गेला होता. यावेळी पार्थ व त्याचे मित्र धरणाच्या पाण्यात होत असताना, पार्थ याला अचानकपणे कसेतरी होऊ लागल्याने ताबडतोब त्याच्या मित्रांनी व आजूबाजूला असलेल्या इतर तरुणांनी त्याला मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही. अखेर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा तपासणी केली घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 09-08-2024
What's Your Reaction?